Monday, July 29, 2024

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी/शेतातील पेरलेल्या पिकाची करावी लागणार नोंद

 शेतकऱ्यांनो पीक विमा नुकसान भरपाई पाहिजे असल्यास तर, आपल्या पिकाची ई पीक पाहणी करावी लागणार, अन्यथा पिक विमा भरपाई पासून वंचित राहल



एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी चालू होणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे.


न्यूज बदलता महाराष्ट्र:-शेतकऱ्यांना एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा दिली जात आहे. मागील वर्षी पिक विमा भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना विमा परतवा मिळालेला नसल्याने शेतकरी नाराज झालेले होते. शेतकऱ्यांना पिक विमा भरताना नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे.

पिक विमा भरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक पेऱ्याची शासन दप्तरी म्हणजेच आपल्या सातबारावर आपल्या पिकाची नोंद करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेती पिकाची झालेली नुकसान भरपाई दिली जाणार नाही. याची शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पीक पेरा सह घोषणापत्र द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही त्यांच्या मोबाईलवर देखील पीक पेऱ्याची नोंद करता येऊ शकते, अशी सुविधा सुद्धा उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे.

आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये पिक पाहणी ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येते. त्यासाठी आम्ही खाली त्याची लिंक दिलेली आहे.

लिंक डाउनलोड करण्यासाटी येथे क्लिक करा 


शेतकऱ्यांनो खरीप आणि रब्बी पिकाची शासन दरबारी नोंद करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करावी लागणार आहे.


या ॲपमध्ये पिकाच्या नावाची तुम्हाला नोंद करावी लागणार आहे.


एक रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा नमुना नंबर आठ आणि पिकाच्या नावाची नोंद करावी लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा भरपाई दिली जाते परंतु यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणते पीक घेतली त्याची तलाठी दप्तरी किंवा स्वतःच्या मोबाईल वरून अथवा आपल्या घराजवळील सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर जाऊन पीक पेरा नोंद करावी लागणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून पिकविराम करू शकता. मोबाईल असेल त्यांनी मोबाईल वरून पिकांवर करता येते मोबाईल नसल्या शेतकऱ्यांना जवळच्या सेतू सुविधा केंद्रात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंद करता येते.


तुम्ही या ॲपच्या माध्यमातून पीक पेऱ्याची नोंद कशी कराल? याची सविस्तर माहिती पाहूया.


वरती दिलेल्या लिंक वर जाऊन मोबाईल मध्ये प्ले स्टोर मध्ये जाऊन ई पिक पाहणी डाऊनलोड केल्यानंतर पेज ओपन होईल पेजवर मोबाईल नंबर टाका आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडा फॉर्म भरून तो समिट करा



महाराष्ट्र राज्यात 11 ऑगस्ट पासून छत्रपती संभाजी नगर मध्ये अग्नी वीर भरती

 जळगाव, जालना ,बुलढाणा ,हिंगोली ,नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांसाठी सुद्धा भरती.


न्यूजबदलता महाराष्ट्र:- 



छत्रपती संभाजीनगर; येथील आर्मी भरती बोर्डाच्या वतीने 11 ते 23 ऑगस्ट दरम्यान अजमेर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्या भरती परीक्षेत सहभागी होता येणार आहे पात्र उमेदवारांना त्यांच्या ई-मेल वर या भरती मेळाव्याची प्रवेश पत्र पाठवण्यात आली ची भरती प्रक्रियेची संचालक कर्नल अनुज सिंगल यांनी सांगितले.

राज्यातील छत्रपती संभाजी नगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे.
विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जिल्हा न्याय आणि संबंधित तारखेस उपस्थित राहण्याची आवाहन करण्यात आली आहे 11 ऑगस्ट रोजी असिस्टंट स्टोर कीपर आणि टेक्निकल कॅटेगिरीतील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना तसेच परभणी जिल्ह्यातील अग्नीवीर जनरल ड्युटी उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची , प्रवेश आणि फिंगरप्रिंट स्कॅनिंग नंतरच प्रवेश मिळणार आहे.


1. उमेदवारांनी सोबत प्रवेश पत्र आणावे .या प्रवेश पत्राच्या आधारित त्यांच्या बोटाची स्कॅनिंग केल्या जाईल .यानंतरच त्यांना शारीरिक आणि मेडिकल चाचणीसाठी प्रवेश दिला जाईल.


2. या चाचणीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची सप्टेंबर महिन्यात मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.


अग्निवीर भरती घेण्यासाठी जिल्हा निहाय यादी.

11ऑगस्ट. 

परभणी 

12 ऑगस्ट. 

नांदेड 

13 ऑगस्ट. 

छत्रपतीसंभाजीनगर(संभाजीनगर ,गंगापूर ,कन्नड, खुलताबाद) 

14 ऑगस्ट. 

छत्रपती संभाजी नगर (पैठण, फुलंब्री ,सिल्लोड, सोयगाव, वैजापूर) 

15 ऑगस्ट. 

जळगाव (अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव ,मुक्ताईनगर) 

16 ऑगस्ट. 

जळगाव(बोदवड, चोपडा, धरणगाव ,एरंडोल, जळगाव ,जामनेर आणि पाचोरा) 

17 ऑगस्ट. 

जळगाव (पारोळा, रावेर ,आणि ,यावल) 

17 ऑगस्ट. 

जालना (बदनापूर, भोकरदन, घनसावंगी आणि जालना तालुका) 

18 ऑगस्ट. 

जालना, अंबड ,जाफराबाद ,मंठा आणि परतुर) 

18 ऑगस्ट. 

हिंगोली (संपूर्ण जिल्हा) 

19 ऑगस्ट.   

बुलढाणा,चिखली,देऊळगाव राजा,जळगाव जामोद खामगाव,लोणार,मलकापूर,मेहकर,मोताळा,नांदुरा, संग्रामपूर शेगाव ,आणि सिंदखेड राजा) 

20 ऑगस्ट. 

सर्व जिल्ह्यातील अग्नीवर टेक्निकल अग्निविर ट्रेडमन आठवी पास या पदाच्या उमेदवारांनी हजर राहावे. 

21 ऑगस्ट. 

सर्व जिल्ह्यातील अग्नी वीर ट्रेडसमन दहावी पास या पदाच्या उमेदवारांनी उपस्थित राहावे 

 

टीप:-ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या भरती परीक्षेत सहभागी होता येणार आहे.

https://amzn.to/3YPYEvh

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...